Monday, September 16, 2024

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

 हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.

   मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे.

      मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन 

मराठवाड्याला क्रूर निजामाच्या रझाकारां पासून मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी "पोलीस ॲक्शन" घेऊन कणखरपणे मराठवाडा निझाम राजवटीतून सोडवला तो हा सुवर्ण दिवस.

मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या असंख्य अनामिक हुतात्म्यांना शतकोटी वंदन.! भारत माता की जय...!!

★इतिहास -

   १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.

     हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता.

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती

 

   सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती... 

◆ जन्म :- २० जून १९५८

    या एक भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या स्वातंत्र्या नंतर जन्मलेल्या त्या सर्वात तरुण आणि राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहेत.  भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या प्रतिभा पाटील  यांच्यानंतर मुर्मू या दुसऱ्या महिला आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या.

        २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश  एनव्ही रमण यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या भारतातील आदिवासी समुदायातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत.

    २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला.  तर पहिल्या अनुसूचित जमातीच्या  (आदिवासी) व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या (तरुण) सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या  झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.

Sunday, September 15, 2024

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

 प्रसिद्ध स्थापत्य अभियंते यांचा जन्मदिन "राष्ट्रीय अभियंता दिन" म्हणून साजरा होतो.. 

  विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम

★जन्म - १५ सप्टेंबर १८६१

★मृत्यू - १४ एप्रिल १९६२

      ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्‍न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे.

     त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम या गावचे. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवास शास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.

       विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.

      स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

       खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. 

Wednesday, September 11, 2024

बायको कशी असावी ?


  तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी....!!

   रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात...!

 'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'!

 'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', 

भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',

 'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'

 'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'


  ★बायको वाल्याकोळयाची....★

   सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी?

        मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा.  तो म्हणजे,....

  ★ बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'

  कारण तीच खरी रामायण कर्त्याची 'कर्ती 'आहे ! हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.

  रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

  वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात

अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. 

Saturday, September 7, 2024

अष्टविनायक गणपती दर्शन


  अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन देवळे महाराष्ट्राची शान आहे. ही आठही मंदिरे प्रेक्षणीय स्थळी आहेत.

  आपणांस व आपल्या परिवारास गणेश उत्सवाच्या शुभेच्छा...!!संपक

~~~~~~~~

 🟢पहिला गणपती – मोरगावचा मोरेश्वर 

मोरेश्वर - मोरगांव, जि. पुणे

~~~~~~~~

🟣दुसरा गणपती  - सिद्धटेकचा सिद्धेश्वर 

चिंतामणी - थेऊर ता, हवेली, जि. पूणे

~~~~~~~~

🔵तिसरा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर 

गिरीजात्मज - लेण्याद्री (डोंगरातलें देवस्थान), जुन्नरः (जिल्हो-पुणे)

~~~~~~~~

🟢चौथा गणपती – महाडचा वरदविनायक 

विघ्नेश्वर - ओझर, ता. जुन्नर; जि.पूणे

~~~~~~~~

🟣पाचवा गणपती – थेऊरचा चिंतामणी 

महागणपती - रांजणगांव, ता. शिरूर, जि. पूणे

~~~~~~~~

🔵सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मज

बल्लाळेश्वर - पाली, ता. सुधागड, जि. कुलाबा

~~~~~~~~

🟢सातवा गणपती – ओझरचा विघ्नेश्वर 

वरद विनायक - महड, (जिल्हो-खालापूर), कुलाबा

~~~~~~~~

🟣आठवा गणपती – रांजणगावचा महागणपती 

गजमुख (सिध्दीविनायक) - सिध्दाक, ता. श्रीगादैं, जि. अहमदनगर

~~~~~~~~

ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!

~~~~~~~~


थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...