संभाजी महाराज

 शिवपुत्र स्वराजवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र शिव अभिवादन..
        जय शंभुराजे...!!

❒ ♦छत्रपती शंभुराजे♦ ❒  

पाहुनी शौर्य तुज पुढे

मृत्यूही नतमस्तक झाला..

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभू अमर झाला..!!

      वयाच्या चौदाव्या वर्षी नखशिकांत, नाईकाभेद, बुधभूषण सारखे संस्कृत भाषेत ग्रंथ लेखन करणारे संस्कृत प्राचविद्यापंडित, आपल्या आयुष्यात एकही लढाई न हरणारे, सात - सात सत्तांच्या विरोधात एकाच वेळेस यशस्वी संघर्ष करून स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्य रक्षक, परम प्रतापी, महापराक्रमी, शूरवीर, शाक्तवीर छत्रपती संभाजी राजे यांना  त्रिवार मानाचा मुजरा...!!

    जगाच्या इतिहासात बापाच्या गादीवर बसण्यासाठी आपल्या सख्ख्या लोकांना मारणारे कैक झाले. पण पित्याच्या विचारांनी चालत राष्ट्रासाठी मृत्यूला कवटाळणारे एकच उदाहरण जगाच्या इतिहासात चिरंजीव राहील ते म्हणजे शंभूराजे...

 साहित्यिक, रणधुरंधर, स्वतंत्रवीर, प्रजाहितदक्ष, अष्टपैलू छत्रपती ....

संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा..!!छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

११ मार्च क्षाञवीर संभाजीराजे बलिदान दिन छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही.  

    रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा...!!

●जन्म :~ १४ मे १६५७

●मृत्यु :~ ११ मार्च १६८९

       मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले.शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते.वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा,श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले.या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते.शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता,थोरले महाराज निधन पावले.महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले.त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला.या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले.रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला;परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले.शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले.या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता.बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता.आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते.म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले.पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात.शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते.छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते.आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती.


     शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती.या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी,पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते.हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही  विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच.या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते.अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजी राजांचेच हवे.एेर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.

     वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले.अटकेत असताना संभाजी राजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली.पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले.देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली.कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची,त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली.जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 

रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा...


   क्षाञवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र शिव अभिवादन. 

        जय शंभुराजे...!!

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...