"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Friday, February 20, 2026

 



शिवजन्मोत्सव 👑

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिव जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना

🧡 शिवमय शुभेच्छा🙏🏻🚩

● जय जिजाऊ जय शिवराय  ●

Friday, January 02, 2026

शिकण्यासाठी जागे व्हा

१८५४ साली क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मराठीमध्ये आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली हा समज हितसंबंधी अभिजन वर्गाने जनमाणसांत रूढ केला. पण केशवसुतांची कविता ५० वर्षानंतरची आहे. त्याच्या आधी पन्नास वर्ष सुमारे १८५४ साली सावित्रीबाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये,


'शिक्षणाने मनुष्यत्व | पशुत्व हटते पहा ||' 


शिकलं की माणूसपण येतं आणि जनावरपण जे आहे ते दूर होतं अशी मांडणी सावित्रीबाईंनी केलेली आहे. त्या कविता, समाजप्रबोधन करणाऱ्या कविता आहेत, विचारप्रवर्तक कविता आहेत, निसर्गाच्या कविता आहेत. संत तुकारामांनी जसं म्हटलं होतं,


'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |'


तसं निसर्गाशी बोलणाऱ्या, फुला-फळांशी बोलणाऱ्या, झाडांशी बोलणाऱ्या, बहुजन समाजाच्या शिक्षणाची काळजी वाहणाऱ्या, त्यांच्या उद्धारासाठी, त्यांचे दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या सावित्रीबाई आपल्याला त्यात दिसतात. सावित्रीबाईंच्या कवयित्री म्हणून असलेल्या योगदानाशी निव्वळ पहिल्या कवयित्री असं नाही, आधुनिक कवयित्री असं नाही तर त्याच्या पलीकडं जाऊन अतिशय सशक्त, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काव्यलेखन करणाऱ्या सावित्रीबाईंची 'शिकण्यासाठी जागे व्हा' ही कविता-


*शिकण्यासाठी जागे व्हा*


उठा बंधुनो अतिशूद्रांनो जागे होऊनि उठा

परंपरेची गुलामगिरी ही

तोडणेसाठी उठा 

बंधूंनो शिकणेसाठी उठा ||धृ||


गेले मेले मनु पेशवे 

आंग्लाई आली 

बंदी मनुची विद्या घेण्या

होती ती उठली ||


ज्ञानदाते इंग्रज आले 

विद्या शिकुनि घ्या रे 

ऐसी संधी आली नव्हती

हजार वर्षे रे ||


मुलाबाळांना आपण शिकवू 

आपणसुद्धा शिकू 

विद्या घेऊनी ज्ञान वाढवून

नीतीधर्महि शिकू ||


नसानसातून इर्षा खेळवू

विद्या मी घेईन 

शूद्रत्वाचा डाग हा माझा

निपटून काढीन ||


राज्यात बळीच्या 

आम्हास विद्या घडो 

यशाची आमच्या 

दुंदुभी नगारे झडो

'इडापिडा टळो' 

या कार्यी भट न पडो ||


असे गर्जूनी विद्या शिकण्या

जागे होऊन झटा 

परंपरेच्या बेड्या तोडुनि

शिकण्यासाठी उठा ||१||


- सावित्रीबाई फुले 



Saturday, December 06, 2025

महामानवाचे महापरिनिर्वाण

 दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma' या ग्रंथांचा मजकूर लिहित होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात 'बुद्धं शरणं गच्छामि ' त्रिशरण म्हणू लागले. नंतर त्यांनी नानकचंद ला 'बुद्ध भक्तिगीते 'हि रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले 'जेवणाची इच्छा नाही' पंरतु नानकचंद ने आग्रहाणे जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला. आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले. नंतर नानकचंद ला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले. मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले," चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा."

त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते म्हणाले " जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे ."

नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते.

दिनांक ६ डिसेंबर ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठेल. ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला 'माईसाहेबांनी तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानाकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले " बाबासाहेब मी आलोय! असे भांबवून मोठयांदा ओरडले.

Monday, November 24, 2025

भारतीय संविधान दिवस – 26 नोव्हेंबर

 The Constitution...


★🇮🇳 भारतीय संविधान दिवस – पूर्वतयारी
      "भारतीय संविधान दिनाच्या " हार्दिक शुभेच्छा.....
★🇮🇳 भारतीय संविधान दिवस – 

✨  २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस ✨

भारताला लोकशाहीची ओळख देणाऱ्या, प्रत्येक नागरिकाला अधिकारांच्या छत्रछायेखाली आणणाऱ्या
महासंहितेला आज आपण अभिवादन करतो!
📜 “संविधान: स्वातंत्र्याची शपथ… लोकशाहीची ताकद!”

🔹 समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता—ही चार मूल्ये आजही भारताची खरी ओळख घडवतात.
🔹 प्रत्येक भारतीयाच्या हातात अधिकार आणि कर्तव्यांची मजबूत ढाल ठेवणारे हेच महान संविधान.
🔹 जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया—आपल्या संविधानावरच उभा आहे!
~●~~~~●~
संविधान दिन 26 नोव्हेंबर कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व बाबींची माहिती घोषणा व इतर सर्व साठी क्लिक करा..
~●~~~~●~
⭐ 26 नोव्हेंबर आजच्या दिवसाचे महत्व
★१९४९ रोजी याच दिवशी संविधान स्वीकृत झाले.
भारताला दिशा देणारा आदर्श नकाशा आजही तितकाच सामर्थ्यशाली आहे.
 “We the People of India” ही फक्त सुरुवात नव्हे—ती एक प्रतिज्ञा आहे.

 🇮🇳 आभार ~
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीतील सर्व महान योगदानकर्ते— तुमच्यामुळे भारत उभा आहे लोकशाहीच्या भक्कम पाया वर!

 🟦 दिवसाची भावना, एक वाक्यात:
“आपले संविधान—राष्ट्राचा अभिमान, नागरिकांची ओळख!”

1. “संविधान: स्वातंत्र्याची शपथ, लोकशाहीची ताकद!”
2. “आपले संविधान, आपल्या अधिकारांचे संरक्षण.”
3. “जनतेसाठी, जनतेद्वारे, जनतेचे—भारतीय संविधान!”
4. “समता, न्याय आणि स्वातंत्र्य—आपल्या संविधानाची तीन स्तंभ.”
5. “भारताला बांधणारा सर्वात मजबूत धागा—संविधान.”
6. “अधिकारांचा दीप, कर्तव्यांची दिशा—भारतीय संविधान.”
7. “आपला अभिमान, आपले संविधान!”
8. “संविधान म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीचा नकाशा.”
9. “विचारांना स्वातंत्र्य, नागरिकांना सामर्थ्य—संविधान.”
10. “लोकशाहीच्या यात्रेचा पाया—भारतीय संविधान.”
🔹“Constitution: The Soul of India.”
🔸“We the People—Our Constitution.”
🔹“संविधान: अधिकारांची हमी.”
🔸“India Runs on Constitution.”
🔹“संविधान—नागरिकांची ओळख, राष्ट्राची शक्ती.”
🔸“India’s Power Script: The Constitution.”
🔹“Be Proud. Be Constitutional.”
🔸“जगण्याची दिशा, संविधानाची भाषा.”
🔹“Rights + Duties = भारतीय संविधान”
🔸“संविधान: भारताची DNA Code.”

Friday, November 14, 2025

पंडित जवाहरलाल नेहरू

    भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते ते स्वतंत्र भारताचे महान पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रवास ही आधुनिक भारताच्या जडणघडणीची एक यशस्वी कहाणी आहे. पारतंत्र्यातून नुकत्याच मुक्त झालेल्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि सहिष्णुतेच्या आदर्श मूल्यांनी अलंकृत केले.

    अवघी १२% साक्षरता असलेल्या भारताला त्यांनी IIT, IIM आणि AIIMS सारख्या शिक्षण संस्थांची देणगी दिली. भाक्रा-नांगल धरणासारखी अनेक 'आधुनिक भारताची मंदिरे' त्यांनी उभारली. आपल्या संशोधनातून आणि तांत्रिक प्रगतीतून जगाला अचंबित करणाऱ्या भारताच्या वैज्ञानिक संस्था या नेहरूंच्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपाक आहेत.

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

  शिवजन्मोत्सव 👑 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती न...