महात्मा गांधी

भारतीय स्वातंत्र्य लढयातील अग्रणी नेते...

 ◆ महात्मा गांधी

🔸जन्म:~ २ ऑक्टोबर १८६९

      पोरबंदर, काठियावाड, भारत

🔹मृत्यू: ~ ३० जानेवारी १९४८

           नवी दिल्ली, भारत

🔸प्रमुख स्मारक:~ राजघाट

🔹प्रभाव:~ लिओ टॉलस्टॉय, 

 जॉन रस्किन, गोपाळ कृष्ण गोखले

🔸पत्नी नाव:~ कस्तुरबा गांधी


   ☀मोहनदास करमचंद गांधी

   ┄─┅•●●◆●●•┅─┄

    🔶२ ऑक्टोबर, हा दिवस भारतात 'राष्ट्रपिता' महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्या 'स्वच्छता' आणि 'स्वदेशी' या विचारांनी आजही आपल्याला प्रेरणा मिळते. गांधीजींचं जीवन हे केवळ एक आदर्श नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी एक मार्गदर्शक आहे. 

   महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.   अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. 

~~~~~~~~

" राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सोपे व प्रभाव पूर्ण भाषणे साठी क्लिक करा >>   

~~~~~~~~


   गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.


    🔷असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.


    🔶गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.


   🔷त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.


 🔶 आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन -

      (२ऑक्टोबर )

      २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन म्हणून  संपूर्ण जगभर साजरा केला जातो. १५ ऑक्टोबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने गांधीजींचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून घोषित करण्याचे ठरवले त्यास सर्व सदस्यांनी संमती दिली. भारतात सर्वधर्मीय प्रार्थना, प्रभात फेऱ्या, सूतकताई करुन हा दिवस साजरा केला जातो.

   🔷 गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगिता वादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते. गांधीजींनी आपल्याला शांतता आणि अहिंसेचं महत्त्व शिकवलं. आजच्या जगात जिथे हिंसा आणि द्वेष वाढत आहे, तिथे गांधीजींचे विचार अधिक प्रासंगिक वाटतात. चला, आपण त्यांच्या 'सत्य' आणि 'अहिंसा' या मूल्यांचा अंगीकार करूया आणि आपल्या सभोवतालच्या जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑


No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

श्रीकृष्ण जन्माष्टमी

  उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...