Saturday, June 17, 2023

राजमाता जिजाऊ माॅ साहेब स्मृती दिन

१७ जून १६७४

" राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांचा स्मृती दिनी " विनम्र अभिवादन..!!

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी "आऊसाहेब जिजाऊ" यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या"पाचाड" या गावी निधन झालं. लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला. स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली. आमचा शिवबा पोरका झाला, आमचा बाळशंभू पोरका झाला, आमचा रायगड पोरका झाला, आमचा सह्याद्री पोरका झाला,

आणि आमचं"स्वराज्य"पोरकं झालं.

आधार गेला आमचा, आता उरला फक्त घनदाट अंधार……

याच"जिजाऊ"ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,

याच"जिजाऊ"ज्यांनी घडविले"राजे शिवछत्रपती".

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नी शंभु छावा....!

जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ....!

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ......!

जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते विजयाचे सोहळे ..... 

~~~~~~||~~~~~||~~~~||~~~~~~

 राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ दिनानिमित्त त्यांच्या प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचाराला त्रिवार अभिवादन.

  बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाच्या जडणघडणीचे श्रेय मा साहेब जिजाऊंना जाते

  मा.जिजाऊमुळेच शिवाजी महाराजांनी जातीभेदांची विषमतावादी, अमानवी निर्बंध दूर करून अठरा पगड जातींना सैन्यात दाखल करून घेतले.

  जनतेच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन पूणे शहराच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवून पूणे राहण्यासाठी व वंशवृद्धी साठी अशूभ ठरवले असता मा.जिजाऊने लोकांनची भिती दूर करण्यासाठी नामी युक्ती म्हणून सोन्याचा नांगर फिरवला .हा विधी कोणत्याही ग्रंथात नव्हता.

   जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवाजी महाराजांनी कोणताही मूहूर्त पाहिला नाही.

   धर्मानुसार समूद्रपर्यटन निषिद्ध असले तरी महाराजांनी समुद्री आरमार उभारले.

   अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा स्वराज्याचा म्हणजेच समतेच्या व मानवतेच्या विरोधात असल्यामुळे त्याचाही शिरच्छेद केला.

   बहूसंख्य लोक केवळ आईच्या इच्छेखातर मनमारून व्रत,तीर्थ, उपासना,नवस ,कूंडली इ् कर्मकांड करीत असतात.कारण तसे संस्कार आईचे असतात.पण जिजाऊंनी शिवाजी महाराजांमध्ये प्रचंड बुद्धिप्रामाण्यवाद लहानपणा पासून पेरुन अंधश्रद्धेतुन बाहेर काढले.. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महान समतावादी, मानवतावादी राज्यकर्ते ठरले.

   अशा राजमाता जिजाऊंच्या क्रांतिकारी विचारांना मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...